शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील जामण्यापाणी गावाच्या दुर्गम जंगलात अवैधपणे उभारण्यात आलेल्या गांजा शेतीचा भंडाफोड करत पोलिसांनी व वनविभागाने मिळून तब्बल २,१२५ किलो गांजा जागेवरच जाळून नष्ट केला. या कारवाईची किंमत तब्बल ₹1,06,25,000 रुपये असून, तालुक्यातील अंमली पदार्थ साखळीवर हा मोठा दणका मानला जात आहे.दुर्गम जंगलात उभी ‘गांजाची बंपर शेती’ – पोलिसांना मिळाली गोपनीय माहिती४ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जामण्यापाणी परिसरातील अतिदुर्गम जंगलात अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात कॅनाबीस (गांजा) लागवड केली आहे.सदर ठिकाणी पोहोचणे कठीण, उंचसखल प्रदेश, वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य आणि मानवी हालचाल नगण्य असल्याने आरोपींनी याच भागात ‘गांजा शेती’चा विस्तार केला होता.न्यायालयाची अनुमती घेऊन थेट जंगलातच मुद्देमाल नष्ट मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशनपर्यंत नेणे शक्य नसल्याने पोलीस निरीक्षक हिरे यांनी एनडीपीएस कायद्यातील कलम ५२(अ) नुसार मुख्य न्याय दंडाधिकारी, जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून जागेवरच गांजा नष्ट करण्याचे आदेश मिळवले.न्यायालयीन आदेशानंतर कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक पंचनामा प्रक्रियानाशाची तांत्रिक पूर्तता करून वनक्षेत्रातच संपूर्ण गांजाच्या झाडांचा नाश करण्यात आला. धुराचे ढग उठत असताना पोलिसांनी अवैध शेतीचा प्रत्येक अंश नष्ट केला.२,१२५ किलो अवैध मालाचा नायनाट – किंमत तब्बल कोटी पार एकूण नष्ट केलेला गांजा : २,१२५ किलो बाजारभाव : ₹1,06,25,000 अंदाजेही आतापर्यंतची शिरपूर तालुक्यातील सर्वात मोठी अंमली पदार्थ विरोधातील कारवाई मानली जात आहे.अज्ञात आरोपींचा शोध सुरू – एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखलकारवाईनंतरज्ञ सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसांनी अज्ञात शेती करणाऱ्यांविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.शिरपूर तालुक्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला गती या कारवाईमुळे तालुक्यात अवैध पदार्थांच्या हालचालींवर मोठा आघात बसला असून, अशा शेतीचा शोध घेण्यासाठी व नष्ट करण्यासाठी पोलिसांनी अधिक गतीने मोहीम सुरू केली आहे.
उत्कृष्ट समन्वय – पोलिस, वनविभाग आणि प्रशासनाची संयुक्त कारवाई संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाई करणाऱ्या पथकात – पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, सागर ठाकूर, संतोष पाटील, चत्तरसिंग खासावड, विजय धिवरे, स्वप्नील बांगर, मनोज नेरकर, जयेश मोरे, भूषण पाटील, प्रकाश भिल, सुनील पवार, रोहिदास पावरा, पाला पुरोहित, भगवान गायकवाड, ज्ञानसिंग पावरा, मुकेश पावरा, अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी इत्यादी धाडसी कर्मचारी सहभागी होते.दुर्गम जंगलातील लांब पायी प्रवास, दाट वनस्पतीतून मार्ग काढणे आणि अवैध शेतीवर छापा टाकणे या सर्व गोष्टींना अत्यंत कौशल्य व धैर्याची जोड लागली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















