धुळे / प्रतिनिधी थंडीची तीव्रता वाढत असताना समाजातील गरजूंना उबदार मदतीचा हात देण्यासाठी धुळे शहरात काल एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे यांच्या पत्नी सौ. सानिक धिवरे आणि त्यांचे सुपुत्र चि. अर्णव धिवरे यांनी स्वतः विविध ठिकाणी जाऊन गरीब, बेघर आणि गरजूंना ब्लॅंकेटचे विनामूल्य वाटप केले.
शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसर, फुटपाथ व सार्वजनिक जागांवर थंडीत थरथरणाऱ्या नागरिकांना शोधत सौ. धिवरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना ब्लॅंकेट दिले. या उपक्रमामुळे रात्रीच्या कडक थंडीत अनेकांना मोठा दिलासा मिळाला.
सौ. सानिक धिवरे यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचला पाहिजे. पोलिस दल समाजासाठी २४ तास राबत असते आणि कुटुंबीय म्हणून आम्हालाही समाजाप्रती कर्तव्य पार पाडण्याचा आनंद आहे.”
या उपक्रमात चिमुकला अर्णव धिवरे देखील उत्साहाने सहभागी झाला होता. गरजू व्यक्तींना ब्लॅंकेट देताना त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
धुळेकरांनी या सद्भावनात्मक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, अशा सामाजिक कार्यामुळे समाजात मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.थंडीच्या कडाक्यात गरजूंना दिलासा
धुळे शहरातील
बसस्थानक रेल्वे स्थानक परिसर महामार्गाच्या बाजूने असलेले फुटपाथ रस्त्याच्या कडेला रात्री आसऱ्याशिवाय झोपणारे नागरिक या ठिकाणी सायंकाळपासून उशिरापर्यंत प्रत्यक्ष जाऊन गरजूंशी संवाद साधत सौ. सानिक धिवरे यांनी ब्लॅंकेटचे वितरण केले. मदत मिळताच अनेकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि कृतज्ञतेचे भाव वातावरण अधिक उबदार करणारे ठरले.
चिमुकला अर्णवचा उत्साही सहभाग
या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरला तो चि. अर्णव धिवरे. आईसोबत फिरत गरजू व्यक्तींना स्वतःच्या हाताने ब्लॅंकेट देताना तो अत्यंत आनंदित दिसत होता. त्याच्या या सहभागातून लहान वयातही समाजसेवेची भावना रुजण्याचा सुंदर संदेश धुळेकरांना मिळाला.
“समाजाशी नाते जपणे हेच कर्तव्य” — सौ. सानिक धिवरे
सौ. धिवरे म्हणाल्या, “पोलिस दल समाजासाठी २४ तास राबत असते. त्यांच्या कुटुंबीयांनीही समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते, हीच भावना मनात ठेवून हा उपक्रम राबविला. थंडीत एक ब्लॅंकेटसुद्धा एखाद्याचे जीवन वाचवू शकते.”
धुळेकरांचे उदंड कौतुक या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी सोशल मीडियावरूनही या मदतकार्याचे कौतुक करत मानवतेचा खरा अर्थ साकारल्याचे गौरवोद्गार काढले. समाजातील उच्चपदस्थांनी स्वतः लोकांमध्ये जाऊन केलेले हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरावे, अशीही शहरात चर्चा रंगली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.






















